मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
जन्माला आली तेव्हा पासून लाडकी झाली...
शाळेत असताना पालक सभेला तिला बापच लागायचा...
बाप पण वेळात वेळ काढून हजर राहायचा...
बापाचे आवडताते उकडीचे मोदक आवरजुन बनवायची...
रोज सकाळी उठल्यावर न चुकता चहा बनवून द्यायची..
तिच्या आवडी निवडी बाप पण जपायचा..
तिचे हट्ट पुरवण्यासाठी वेगळे पैसे साठवायचा...
आपली मुलगी म्हणजे त्याला हृदयाचा तुकडा वाटायचा...
मुलगी आता मोठी झाली दुसर्याच्या घरी जाणार..
शोधनार मी तिच्यासाठी सुंदर राजकुमार...
असे सारखे म्हणायचा....
मुलगी मात्र आपले हृदय एका पर जातीतल्या गरीब मुलाला देऊन बसली होती...
बाबाना कसे सांगायचे या विचाराने ती खचली होती...
न सांगताच ती एक दिवस त्याच्या सोबत पळून गेली..
जाताना मात्र बपाच्या हृदयात ठिणगी पेटवून गेली.
आपला हृदयाचा तुकडा आपल्याला दुखवून गेला...
हे समजल्यावर त्याला हृदय विकराचा झटका आला...
दवाखान्यात नेताना वाटेतच तो जग सोडून गेला...
एकदा जरी तिने आपल्या मनातले सांगितले असते...
बापाने आनंदाने तिचे लग्न करून दिले असते...
कारण तिच्या सुखाशिवाय त्यालाही दुसरे काय हवे होते...
मुलगी कधी वयात आली कळलच नाही....
बपाच्या प्रेमाची जागा त्याने कधी घेतली कळलच नाही...
------------------सचिन आचरेकर
Friday, April 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment